मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.६४ पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत येत्या ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो, त्यातही ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू होणार आहे.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ इतकी आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबईकरांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्याचा उपलब्ध पाणीसाठाही पुरेसा नसल्याने पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. मात्र २०२३ या वर्षात ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. शनिवारी म्हणजेच आज मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरच्या तुलनेत आता केवळ ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

Mumbai, storage, dams, water storage,
मुंबई : धरणांमध्ये निम्म्याहून अधिक साठा, सात धरणांमध्ये ५३ टक्के पाणीसाठा
severe shortage of water in cidco colony
सिडको वसाहतींमध्ये पाणीटंचाई; २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिक हवालदिल, उरणवासीयांना मात्र कपातीपासून दिलासा
dams that supply water to mumbai have more storage than last year
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा
Heavy Rain, Heavy Rain Boosts Pavana Dam, Pavana Dam Water Levels boost, Averting Water Crisis for Pimpri Chinchwad , pimpri chinchwad news, marathi news,
पिंपरी चिंचवड: पवना धरण परिसरात गेल्या २४ तासात तब्बल १३२ मिलिमीटर पाऊस; पाणी साठ्यात झाली वाढ
water storage reached upto 25 percent in dams after continue rain zws
पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; मात्र मुंबईतील पाणीकपात कायम; धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर
Thane Water Crisis, Thane Water Crisis Deepens, Main Distribution water System Failure in thane, thane water problems, thane news,
ठाण्यात पाणी टंचाईचे संकटात भर, मुख्य वितरण व्यवस्थेमध्ये बिघाड
navi Mumbai morbe dam marathi news
मोरबे धरणातही यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस! एका दिवसात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद
Water scarcity, West Vidarbha,
पश्चिम विदर्भात पाणीबाणी, पावसाळ्यातही टँकरच्या संख्‍येत वाढ; १०५ गावांना टँकरने पाणीपुरवठा

हेही वाचा – पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक २६ जूनला

हेही वाचा – मुंबई पदवीधरवरून भाजप, शिंदे गटात चढाओढ; ठाकरे गटाकडून अनिल परब उमेदवार

भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. दरम्यान, यंदा पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकरून पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे