मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप करीत शुक्रवारी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध केला.

हेही वाचा- अमरावती : ‘नवनीत राणा जात प्रमाणपत्रावर का बोलत नाहीत? सुषमा अंधारे यांचा सवाल

ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुका आणि विविध राज्यातील पोटनिवडणुकी संपल्यानंतर घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरचे दर ५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर ३५० रुपयांनी वाढवण्यात आले. यामुळे बजेट कोलमडले असून जनतेत रोष निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज निदर्शने केली, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली.गॅस सिलिंडर भाव वाढल्याच्या विरोधात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नॅश अली यांच्या नेतृत्वाखाली व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरचे दर अचानक वाढल्याने या आंदोलक महिलांनी चक्क चुली पेटवून प्रतीकात्मक निषेध नोंदवला.

हेही वाचा- पोलिसांना केवळ अडीचशे रुपये ‘तंदुरुस्ती’ भत्ता!, १९८५ पासून रकमेत बदल नाहीच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर अन्यायकारकरित्या वाढवल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे, असे नॅशी अली म्हणाल्या.केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. प्रचंड महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि आता मतदान करणाऱ्या जनतेच जगणे कठीण करीत आहेत. त्यामुळे सरकारचा आम्ही निषेध करतो आणि ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले.