अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत १४ व्या हप्त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे. अद्यापही २२ हजारहून अधिक लाभार्थ्यांचे ‘ई- केवायसी’ पूर्ण नसल्याने त्यांना लाभ मिळू शकला नाही. नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे.

पीएम किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांचे ‘ई-केवायसी’, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे बंधनकारक आहेत. ते पूर्ण न करणारे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. कृषी विभागामार्फत नुकतीच याबाबत मोहिमही राबविण्यात आली. अद्यापही अकोला जिल्ह्यात २२ हजार १४० लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ व १२ हजार ७४१ लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… “दहा लाखात तलाठी व्हा, थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा!” परीक्षा सुरू होताच १६ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका आली बाहेर, एकाला अटक

विभागाकडून वारंवार सर्वंकष प्रयत्न करून देखील ‘ई-केवायसी’ व बँक खाते आधार संलग्नीकरणासाठी प्रतिसाद न देणाऱ्या लाभार्थ्यांना पोर्टलवरून वगळण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. पीएम किसान योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांनी ‘ई-केवायसी’ व बँक खाते आधार संलग्नीकरण १० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिसाद न दिल्यास लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याची कार्यवाही होईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाभार्थ्यांनी ई- केवायसी व बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यापुढे ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास नाव वगळण्यात येणार आहे. – शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.