नागपूर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर एक आगळावेगळा उपक्रम करीत असून नागपूरच्या बी आर मुंडले शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ते पाच हजार किलो समरसता भाजी शिजवत असून त्याची सुरुवात रविवारी सकाळी सुरू केली.

हेही वाचा >>> चंद्रपूर: भद्रावतीची खुशबू ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये; महानायक अमिताभ बच्चन यांना भेट दिल्या ‘ग्रामोदय’निर्मित वस्तू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवसाच्या  निमित्ताने समरसता दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून  आणलेल्या भाज्या चिरल्या आहेत.  कढइमध्ये एकत्रित शिजवल्या जात आहे . या भाजीला ही समरसता भाजी असे नाव देण्यात आले आहे. भाजी  करण्याची तयारी सुरू झाली यात ३९६ किलो तेल, ३३०  किलो कांदे,६६१  किलो बटाटे, गांजर ३३० किलो, एक हजार किलो कोबी, टमाटर ६६१ किलो व मटर ३३० किलो सह इतर साहित्यांचा वापर करून ही पाच हजार किलोची ही भाजी तयार होत आहे.