‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’चा जागतिक अभ्यास

नागपूर : हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे. या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे ५० विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे. सोमवारी याबाबतचा अहवाल प्रकाशित झाला. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे. चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील २०५० मध्ये अव्वल २०० पैकी अर्ध्याहून अधिक (११४) जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. या अभ्यासानुसार, २०५० मधील अग्रणी ५० सर्वाधिक जोखीम असलेली राज्ये आणि प्रांतांपैकी ८० टक्के चीन, अमेरिका आणि भारतातील आहेत. चीननंतर, भारतामध्ये सर्वोच्च जोखमीच्या यादीत बिहार २२व्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश २५, आसाम २८, राजस्थान ३२, तामिळनाडू ३६, महाराष्ट्र ३८, गुजरात ४८, पंजाब ५० आणि केरळ ५२व्या क्रमांकावर आहे. आसाम राज्यात १९९०च्या तुलनेत २०५० पर्यंत बदलत्या हवामानामुळे पर्यावरणाचा धोका ३३० टक्क्याहून अधिक पटीने राहील, असे या अभ्यासात नमूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine indian states at high risk of damage due to climate change issue zws
First published on: 22-02-2023 at 05:47 IST