अनेक शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करतात. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी स्थिती उदभवत असल्याने शेती परवडत नसल्याची ओरड वाढत चालली आहे. परंतू वाशीम येथील शेतकऱ्याने केवळ तीन एकरात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लालयपूरी खरबूजाची लागवड करून केवळ ८२ दिवसात लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या खरबुजाला काश्मीरच्या बाजारात चांगली मागणी मिळत असल्याने थेट शेतातून काढलेले खरबूज काश्मीर येथे पाठविले जात आहे.

हेही वाचा- अंबाझरी उद्यान विकास प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन; गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा. लिमिटेडचे संचालक नरेंद्र जिचकार यांची माहिती

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

शेती परवडत नसल्याची ओरड होत असतांना शेतकरी आता नवनवीन व बाजारात मागणी असलेल्या पिकांकडे वळत आहे. रासायनिक पध्दतीपेक्षा सेंद्रिय शेतीची गरज ओळखून नवनवीन प्रयोग शेतात राबविण्यात येत आहेत. असाच अनोखा प्रयोग वाशीम येथील शेतकऱ्यांने यशस्वी करुन दाखविला आहे. राधेश्याम मंत्री यांची शहरापासून जवळच असलेल्या तामसी सोनखास शेतशिवरात शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर लायलपुरी जातीच्या खरबुजची लागवड केली. लागवड केल्यानंतर ८२ दिवसात खरबुजाची तोडणी करुन हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला. थेट शेतातूनच त्यांच्या चवदार खरबुजांना १७ रुपये प्रतिकिलो एव्हडा दर मिळाला आहे. येथील शेतकरी मंत्री यांनी त्‍यांच्या शेतातून पहिल्या तोडणीतून २० टनांचे खरबूज काढले तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन काढले जाण्याचा अंदाज आहे. ज्यामधून त्यांना अंदाजे सहा ते सात लाखांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा- वर्धा: हिंदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाने तणावपूर्ण वातावरण, पोलीस बंदोबस्तात वाढ; जाणून घ्या कारण…

रासायनिक खते, किटकनाशक विरहित शेती

शेतात रेड अँपल बोर लावली आहे. त्याच्या मधोमध लालयपुरी खरबुजाची लागवड केली आहे. मात्र झाडं सध्या लहान असल्याने आंतरपीक म्हणून पावसाळ्यात सोयाबीन आणि आता खरबुजाचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही रासायनिक खतं किंव्हा कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही त्यामूळे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने खरबूजाची लागवड केल्याने त्याची चवही अत्यंत गोड आहे.