नागपूर : मान्सूनचा भारतातील प्रवेश अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांच्या स्थिरतेनंतर नैऋत्य मान्सून यावेळी बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रातही कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – भंडाऱ्यातले एक माकड लय भारी, त्याची हॉटेलिंगची तऱ्हाच न्यारी; दर मंगळवार आणि शनिवारी बुक असतो टेबल, जिलेबी आणि समोसासह…

राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि लगतच्या किनारी भागातील लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तर येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे पावसाची शक्यता वतवली आहे.

हेही वाचा – विकृतीचा कळस! भिलाईतील नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार; गोंदिया आरपीएफने आवळल्या मुसक्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबादच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांसाठीही ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.