|| चंद्रशेखर बोबडे

तिसऱ्या टप्प्याला राज्यात विलंबाचा फटका

Devendra Fadnavis
महायुतीत पुढील मुख्यमंत्री कोण असेल? फडणवीस स्पष्ट म्हणाले, “ज्या पक्षाच्या जास्त जागा…”
nashik, External Affairs Minister, S Jaishankar, External Affairs Minister S Jaishankar, Maharashtra s Role in Food Grain, Trade Routes, Foreign Policy Differences,
व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Increase in the number of dengue patients in the state of Maharashtra
राष्ट्रीय डेंग्यू दिवस विशेष: राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यू मात्र नियंत्रणात
Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar
राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
narendra modi nashik rally
“राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!
lok sabha elections 2024 maharashtra phase 3 elections campaigning ends
तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात ; महाराष्ट्र, कोकणात अटीतटीची लढाई, आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिक धारदार प्रचार; युतीला ७, मविआला ४ जागा राखण्याचे आव्हान ;९३ जागांसाठी मतदान
loksatta district index measuring progress of maharashtra districts
उद्योग, रोजगाराच्या प्रश्नांमुळे पीछेहाट; उपराजधानीत साधनसंपत्ती असूनही विकास संथगतीने
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन

नागपूर : ग्रामीण भागाला प्रमुख रस्त्यांशी जोडण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला महाराष्ट्रात लालफितशाहीचा फटका बसला आहे. निविदा काढण्यासाठी विलंब झाल्याने २०२१-२२ या वर्षांत उद्दिष्टाच्या केवळ १८ टक्केच काम होऊ शकले.

२०२१-२२ या वर्षांत महाराष्ट्राला १४०० कि.मी. रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते. ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत २५७ कि.मी.चेच (१८ टक्के) काम झाले. नागपूर जिल्ह्याला १६९ किमी.च्या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी फक्त एकच किमी.चे काम झाल्याची नोंद ग्राम विकास विभागाच्या संकेतस्थळावर आहे. कामाला विलंब  होण्यासाठी निविदेला उशीर होणे व तत्सम कारणे कारणीभूत ठरली. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्ते बांधणीसाठी ७० दिवसात निविदा काढायच्या होत्या. पण महाराष्ट्रात या कामाला खूप विलंब झाल्याने कामाची गती मंदावली, असे केंद्रीय ग्रामीण विकास विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्राची कामगिरी सरस आहे.  तिसऱ्या टप्प्यात ६५५० किलोमीटरच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र तिसऱ्या टप्प्याला संथगतीचा फटका बसला. यासंदर्भात वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान, मंजुरी मिळालेल्या काही कामांना अलीकडेच  सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची गुणवत्ता तपासणी व इतर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून  सांगण्यात आले.

तिसऱ्या टप्प्याची स्थिती

  वर्ष- २०२१-२२

उद्दिष्ट- १४०० किमी

साध्य- २५७ .६८ किमी.

(४ फेब्रुवारी २०२२)

टक्केवारी- १८ टक्के