बुलढाणा : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून अन्नत्याग करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सहकाऱ्यांसह आज बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. आज संध्याकाळी त्यांची राज्य सरकार समवेत मागण्यांविषयी बैठक असून या निर्णायक बैठकीकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. रविकांत तुपकरांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज संध्याकाळी ४ वाजता बैठक लावण्यात आली आहे. सह्याद्री अतिथिगृहावर बैठक पार पडणार असून शासनाच्या संबधित विभागाचे सचिव, वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार, हे आहे कारण…

Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
Nagpur, cyber crime, financial fraud, sextortion, Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur, trained staff, cyber police, public awareness, cyber crime news
सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश
Yeola, potholes, Nashik, Yeola potholes,
नाशिक : खड्ड्यांमुळे येवलेकर त्रस्त
Badlapur Crime News : School Male Cleaner Abuse Girls in Badlapur| Badlapur News Updates in Marathi After the incident in Badlapur the district collector ordered to check the Sakhi Savitri committees in schools
Badlapur School Case : बदलापूरातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग; शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश
Traffic congestion at different place in Nashik city
नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळात दहा पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे निकटवर्तीय सुत्रांनी सांगितले. मंगळवारी दुपारी १ वाजता शेकडो पदाधिकारी , शेतकरी यांच्यासह तुपकर मुंबईकडे रवाना झाले होते. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जांब या गावी चार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांची भेट घेतली होती. तसेच २९ तारखेला शासकीय बैठक लावण्यात आल्याने अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र बैठक यशस्वी झाल्यावरच अन्नत्याग मागे घेणार असे तुपकरांनी स्पष्ट केले होते. प्रकृती खालावलेली असतांना ते मुंबईकडे रवाना झाले.