लोकसत्ता टीम

नागपूर: ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी नैतिकता म्हणून चौकशीला सामोरे जाताना गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला तशी नैतिकता म्हणून पत्नीची चौकशी होताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत का? यावर आधी ज्ञान पाजळावे मग इतरांना सांगावे, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

Shyam Manav on Devendra Fadnavis
Shyam Manav : “सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…”, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांचा उल्लेख करून श्याम मानव यांचा पलटवार
vilas lande letter, vilas lande, Sharad Pawar,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या माजी आमदाराचे भाजपा श्रेष्ठीला पत्र
Sharad Pawar, Sharad Pawar news,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी; अमित शहांनी केली होती जहरी टीका
Sunil Shelke, Supriya Sule, Baramati,
“आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”, आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद
FIR, developer, Radhai illegal building, Nandivali Panchanand Dombivli, BJP party workers
डोंबिवली नांदिवली पंचानंंद येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ
devendra fadnavis
“काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र!
Manorama Khedkar
Manorama Khedkar : पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर नॉट रिचेबल! पोलीस म्हणाले, “आम्ही त्यांच्या घरी…”
aspirants, Suresh Khade, Sangli,
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात इच्छुकांची संख्या वाढली

सुषमा अंधारे नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. गृहमंत्र्यांच्या घरात सहा वर्षे अमृता फडणवीसांची मैत्रीण बनून असणारी एक बाई काय करत होती हे कुठल्या तोंडाने सांगत आहे. हे एका अर्थाने गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या अनेक ठिकाणी सभा घेत असताना मी कधीच चोर म्हणून उच्चार करत नाही. पण समोर बसणारे प्रेक्षक जेव्हा ५० खोके एकदम ओकेची घोषणा देतात तेव्हा तुम्ही कुणाकुणाला अटक कराल, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही खोक्यांचा व्यवहार केला, आता हे माझ्या मते गावागावात आणि घराघरात माहिती झाले आहे. हे आम्ही सांगायची गरज नाही.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असलेले आमदार बच्चु कडू सांगतात की कुठेही लग्नाला गेलो तर तिकडचे वऱ्हाडीसुद्धा खोके वाले लोक आले म्हणून आम्हाला बोलतात. त्यामुळे कुणाकुणाला अटक करणार आहात, असेही त्या म्हणाल्या.