वाशीम  : सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई उद्भवली आहे.  याची सर्वात मोठी झळ मुक्या प्राण्यांना सोसावी लागत आहे. रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथे तीन रोही पाण्यासाठी भटकंती करीत असताना ३१ मे रोजी विहारीत पडून मृत्युमुखी पडले. जंगलात पाणीच नसल्याने वन्यप्राणी गाव, शेतशिवारात भटकंती करीत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे.

हेही वाचा >>> “इंडिया आघाडीचे सरकार येणार आणि राहुल गांधी पंतप्रधान होणार,” विजय वडेट्टीवार यांचा विश्वास; म्हणाले…

murder on suspicion of mobile phone theft, suspicion of mobile phone theft,
भिवंडीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाची हत्या, शांतीनगर पोलिसांनी केली सातजणांना अटक
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Kaveri Chowk in Dombivli MIDC is prone to accidents due to hawkers traffic and vehicles in chowk
डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकाला फेरीवाल्यांचा विळखा, विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी
leopards body found in well in Mhasrul tied with heavy iron objects
बिबट्याच्या मृत्यूमागे घातपात, वन अधिकाऱ्यांचा संशय
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
The death of firemen at Deolali firing range due to old gun What are the potential hazards at the firing range
देवळाली फायरिंग रेंजवरील अग्निवीरांचा मृत्यू जुनाट तोफेमुळे? फायरिंग रेंजवर कोणते धोके संभवतात?
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Villagers set fire to police outpost in West Bengal after 9-year-old girl’s rape-murder
Rape and Murder Case : धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, संतप्त गावकऱ्यांनी पोलीस चौकीच पेटवली!

रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा शेतशिवारातील शेतकरी डॉ.संजाबराव लांबाडे यांच्या विहिरीमध्ये ३१ मे रोजी तीन रोही पडले.  यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. वन विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करून विहिरीतील रोहींचे मृतदेह बाहेर काढले.

हेही वाचा >>> गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे

प्राण्यांची काळजी कोण करणार ? वाशीम जिल्ह्यात जंगल परिसर बऱ्यापैकी आहे. यामध्ये विविध प्रजातीचे प्राणी आहेत. परंतु सध्या जंगलात पाण्याची सुविधा नसल्याने पाण्याच्या शोधात प्राणी गावाकडे धाव घेत आहेत. बहुतांश विहिरींना कठडे नसल्याने त्याचा अंदाज प्राण्यांना येत नसून विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. तरीही वन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना अपयशी ठरत असून मुक्या प्राण्यांच्या जीवाची किंमत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.