नागपूर : भारतातील व्याघ्रप्रकल्प, अभयरण्यांमध्ये पर्यटनाची इच्छा असली, तरी पर्यटकांना त्यांच्या इच्छेला आवर घालावा लागणार आहे. कारण, भारतातील सर्व व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागणार आहे. शाळांना उन्हाळी सुट्या असल्या तरी भारतातील व्याघ्रप्रकल्प, अभयारण्यांना मात्र पावसाळी सुट्या लागतात. येत्या एक जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून पर्यटनाचे प्रवेशद्वार बंद होणार आहेत. मात्र, या सुट्या व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या कोअर म्हणजेच गाभा क्षेत्राला असून बहुतांश ठिकाणी बफक्षेत्र पर्यटनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सफारी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना तीन महिने जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड कऱ्हांडला, बोर व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रभावित झालेल्या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. जंगल पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हा निर्णय वन विभागाकडून दरवर्षी घेण्यात येतो. हे रस्ते कच्चे आणि मातीचे आहेत. पावसाळ्यात खूप चिखल होतो. त्यामुळे जीप व इतर वाहने अडकून पर्यटकांना त्रास व असुरक्षित परिस्थिती निर्माण होते. तसेच पावसाळा हा वन्यजीव, पक्षी, कीटक यांच्या मिलनाचा देखील काळ असतो.

हेही वाचा…Video : वाघिणीने केली रानगव्याची शिकार.. आणि बछड्याने मारला ताव

अशावेळी वाहनांमुळे जमिनीवरील हे हे छोटे जीव चिरडून जाऊ नयेत, ही कारणे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात जंगल बंद करण्यात आली आहे. मात्र, कमी दर आणि कमी गर्दी यामुळे पावसाळ्यातील वन्यजीव सफारीला जाणे खरोखर मोहक आहे. या जंगलातील दाट पर्णसंभार डोळ्यांना अत्यंत शांत करणारा हिरवागार प्रभाव प्रदान करतात. तुम्ही पावसाच्या थेंबात भिजत असताना वाघांसह वन्यजीव पाहणे हे आनंददायी असते. हिरव्यागार जंगलात जिव्हाळ्याचा निसर्ग आणि वाघ पाहण्याचा तुमचा हेतू असेल, तर पावसाळ्यातील जंगल सफारी उत्तम आहे. या सफारीचा आणखी एक फायदा म्हणजे जंगलातील धबधबे. पावसाळ्यात राष्ट्रीय उद्यानातील बहुतेक बफर झोन सफारींसाठी खुले असतात. तर दक्षिण भारतातील काही राष्ट्रीय उद्याने वर्षभर पूर्णपणे खुली असतात. ताडोबा, पेंच, कान्हा, रणथंबोर, नागरहोल या उद्यानांचे बफर झोन वाघांच्या दर्शनासाठी खूप चांगले आहेत.

हेही वाचा…दारू सोडविण्याच्या नावावर अमानुष मारहाण; कथित बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात सफारी आता तुलनेने सहज उपलब्ध होतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हिरव्यागार जमिनीवर फिरत असताना आजूबाजूला विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. क्रेस्टेड सर्प गरुडांची हाक ऐका किंवा झाडांवर उडणारे रंगीबेरंगी फ्लायकॅचर पहा. वाघ दिसणे सामान्य असले तरी, पाऊस गौर आणि ठिपकेदार हरीण यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांना ताजे हिरवे कप्पे शोधत बाहेर आणतात, ज्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे सोपे होते. तर, मध्यप्रदेशातील पेंच पावसात जंगलाचा शांत अनुभव देते. पावसाळ्यात गाभा क्षेत्र बंद असले तरी, खवासा, रुखड आणि तेलियासारखे पेंचचे बफर हे पावसाळ्यात सफारी करण्यासाठी काही प्रमुख सफारी प्रवेशद्वार आहेत. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हाडला अभयारण्य च्या गाभा भागातील सफारी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिल्लारी, खुर्सापार, कऱ्हांडला , गोठणगाव आणि इतर सर्वाधिक मागणी असलेले सफारी गेट बंद राहतील. त्याचबरोबर बफर भागात मान्सून सफारी उपलब्ध असेल.