नागपूर: सदरमधील वाहन कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावर उड्डाण पुल बाधून अनेक वर्ष झाले तरी तेथील सकाळी आणि रात्रीच्या वेळेतील गर्दी मात्र अजूनही कायम आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचा खरच काही उपयोग झाला का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

रिझर्व्ह बँकेपासून मानकापूर टोकापर्यंत दररोज होणारी वाहनांची गर्दी या भागातील नागपूरकरांसाठी डोकेदुखी ठरली होती. पार्किंगसाठी या मार्गावर जागा नसल्याने दिवसभर येथे वाहन कोंडी होत होती. रस्ता रुंदीकरणालाही जागा शिल्लक नव्हती. उड्डाण पुल हा एकमेव पर्याय शिल्लक होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिझर्व्ह बँक चौक ते मानकापूर चौकापर्यत उड्डाण पुल बांधला, काटोकडे जाण्यासाठी या पुलावरून वेगळा मार्ग करण्यात आला. पण हा पुल झाल्यावरही पूर्वीच्या सदर मार्गावरील गर्दी काही कमी झाली नाही. आजही येथे वाहने ठेवायला जागा शिल्लक नाही. मग पुलाची उपयोगिता काय? पुलाचा आराखडा चुकला का?

water leaking, petrol tank, two-wheeler,
दुचाकी- कारच्या पेट्रोलच्या टाकीतून पाणी निघतेय? तर इंजिनला धोका
Kalyan, signal malfunction, Central Railway, service disruption, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Kasara, Karjat, local trains, commuter chaos, railway stations, passengers, Dombivli, rain, road traffic, transportation, thane news, marathi news, kalyan news, Central railway news, loksatta news,
कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त
best buses, fleet of buses, BEST initiative, fleet of buses owned by BEST in the BEST initiative is decreasing, Best bachao Campaign, Brihanmumbai Electricity Supply and Transport Undertaking,
७५ वर्षापासूनची बेस्ट उपक्रमाची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाचवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’कडून पुढाकार
Mumbai, traffic, rain, Train,
मुंबई : पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक सेवेवर परिणाम, कर्जत-चौक दरम्यान रेल्वे सेवा ठप्प
fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
About 700 to 800 local trains were canceled on the first day of the week due to Central Railway mismanagement Mumbai
मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराने आठवड्याची सुरूवात; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे ७०० ते ८०० लोकल फेऱ्या रद्द
Cracks, concrete road,
डोंबिवली एमआयडीसीत काँक्रीटच्या रस्त्याला तडे, दोन महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता खराब
Kasara ghat, birhad morcha
कसारा घाटात बिऱ्हाड मोर्चाच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

हेही वाचा >>> मुलांच्या प्रेमापोटी डॉक्टर दाम्पत्याचा संसार पुन्हा फुलला; ‘भरोसा सेल’च्या समुपदेशनाचा सकारात्मक परिणाम

मुळात ज्यांना सदर किवा परिसरातील बाजारपेठेत जायचे असेल तर त्यांना पुलावरून जाण्याचा काहीही उपयोग होत नाही. ज्यांना थेट मानकापूर किंवा त्यापुढे जायचे असेल किवा काटोल मार्गावर जायचे असेल तेच पुलाचा वापर करतात. यापैकी ज्यांना काही खरेदी करायची असेल तर ते पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे पुल झाला पण वाहतूक कोंडी कायम असे सध्याचे चित्र आहे. रेसिडेन्सी रोड उड्डाणपुलाचा विकास ढासळल्याचे प्रमुख उदाहरण आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) इमारतीच्या मागे लँडिंगच्या सदोष डिझाइनमुळे राष्ट्रीय महामार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशातील ही एक अनोखी घटना असावी. सदर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या प्रकल्पाचा उद्देश होता. परंतु, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस, जमिनीवरची परिस्थिती पूर्वीसारखीच बिकट असते. किंबहुना, आता एक इंचही पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने हा उड्डाणपूल त्रासदायक ठरला आहे.