नागपूर : बहीण आणि बाळासह देवदर्शनासाठी जात असताना महिलेच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू झाला. दोन्ही महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथर्व असे मृत बाळाचे नाव आहे तर आई संध्या आशीष बारमाटे (२५, रा. घाटरोहणा, गोंडेगाव-पारशिवनी) आणि दीपाली प्रकाश पाटील (२४, रा. खापरी रेल्वे कॉर्टर, खापरी) अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.

हेही वाचा – नर्मदेच्या पुरात नागपूरच्या डॉक्टरसह पाचजण अडकले, नितीन गडकरींनी केली मदत

हेही वाचा – गणरायाच्या आगमनासह कोसळणार पावसाच्या सरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संध्या बारमाटे यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिला १४ महिन्यांच्या बाळासह टाकळघाटला देवदर्शनाला जायचे होते. संध्याची विवाहित बहीण दीपाली पाटील ही खापरीमध्ये राहते. त्यामुळे संध्या ही पती आशीष व मुलगा अथर्वसह दुचाकीने दीपालीच्या घरी गेले. शनिवारी सायंकाळी टाकळघाटला जाण्यासाठी संध्या ही बहीण आणि बाळासह दुचाकीने जात होत्या, तर आशीष बारमाटे आणि प्रकाश पाटील हे बसने टाकळघाटला गेले. जामठ्यापासून जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात बाळाचा मृत्यू झाला तर संध्या आणि दीपाली गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच ट्रकचालकाने पळ काढला. काही वेळात हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.