scorecardresearch

Premium

पाणी टंचाईची दाहकता वाढली! मेहकर, बुलढाणा तालुक्यातील तीव्रता अधिक

अन्य तालुक्यांच्या तुलनेत मेहकर व बुलढाणा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे.

water scarcity Mehkar
पाणी टंचाईची दाहकता वाढली! मेहकर, बुलढाणा तालुक्यातील तीव्रता अधिक (प्रातिनिधिक छायाचित्र)

बुलढाणा : मे अखेरीस पाणी टंचाईची दाहकता वाढली असून, अन्य तालुक्यांच्या तुलनेत मेहकर व बुलढाणा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील १८५ गावांतील तब्बल एक लाख नागरिकांना खाजगी टँकर व खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे. या परिणामी पाण्यासाठी लाखावर ग्रामस्थांना प्रामुख्याने गृहिणींना भटकंती करावी लागत आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हेही वाचा – “काँग्रेसमुळेच भाजपा आज सत्तेत!”; असदुद्दीन ओवैसी यांची टीका, म्हणाले “पंतप्रधान मोदी यांच्या काळात…”

जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १५ गावांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपरखेड, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, गोंधनखेड, सावळा व देव्हारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय सावरगाव माळ (सिंदखेडराजा), पोखरी, तपोवन (मोताळा), वरवंड (मेहकर), धोडप, डोंगरशेवली (चिखली), किनगाव जट्टू (लोणार) या गावातही टँकर सुरू आहेत. मागील आठवड्यात टँकरची संख्या १२ इतकी होती. दुसरीकडे १० तालुक्यांतील १७० गावांची तहान १८१ अधिग्रहित विहिरीवरून भागविली जात आहे. मेहकरमध्ये ४२ गावांसाठी ४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

हेही वाचा – वर्धा : नागरी बँकेवर सायबर दरोडा; हॅकिंग करीत सव्वा कोटी केले लंपास

दीड कोटींचा खर्च

दरम्यान आजवर करण्यात आलेल्या उपाय योजनांवर २८ मे अखेर १ कोटी ५३ लाख रुपये खर्ची करण्यात आले आहे. १८५ गावांत कृती आराखड्यातील १९७ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 12:05 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×