चंद्रपूर : कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे.एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे. सावध असा तुफानाची हिच सुरवात आहे, नारायण सुर्वे यांची ही कविता कामगारांच्या व्यथा वेदनांसोबत त्यांचा बाणाही दर्शवून  नवा आशावादही दाखवून देतात.

डोक्यावर हेल्मेट अनं हातात चारचाकीचा हॅन्डल घेत दिवसभर ओझ वाहणा-या एका अपंग कामगारासाठी सोमवार ५ मे हा दिवस आगळा वेगळा ठरला. चारचाकीवरून सामान पोहचता करतांनाच फोन आला अनं बारावीत ५०  टक्के गूण मिळवून उत्तीर्ण झाल्याची गुड न्यूज त्याला मिळाली.अन त्याच्या आनंदाला पारावार उराला नाही.

गावातील रस्त्यावर त्याचा रोजचा संघर्ष बघणारेही त्याच्या वेगळया यशाचे गुणगाण गात आहेत.

गोंडपिपरी येथील सदाशिव मेश्राम हे चारचाकी चालविण्याच काम करतात.त्यांचा आश्विन नावाचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला बोलता अनं चालताही येत नाही. पण त्याच्यात मात्र कमालीचा आशावाद आहे. एकटया वडीलाच्या रोजीन कुटुंबाच भागत नाही म्हणून तो सातवीत शिकत असताना पासून कामाला लागला. लोकांच्या सामानाच ओझ वाहू लागला.

तो शाळा शिकायचा मात्र नाही बरोबरच.घरांच्यानाही त्याच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. पण कसेबसे करित त्याने दहावीपर्यतचे शिक्षण घेतले.गावातील या कामगार मुलाकडे दिपस्तंभ अभ्यासिकेचे संचालक निखील खोब्रागडे यांचे लक्ष गेले मग काय खोब्रागडेंनी त्यांच्यात जिदद भरली.त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

दरम्यान शाळा सोडण्याचा विचार करणा-या आश्विनला मात्र अभ्यासाची ओढ लागली. त्याने जनता विद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.यावर्षी त्याची बारावी होती.पण कामाच्या व्यापाने त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नाही.

नित्यनियमाप्रमाणे लोकांच्या सामानाचे ओझे वाहत असतांना बारावीची परिक्षा उत्तीर्ण केल्याची गुड न्यूज त्याला मिळाली.अनं त्याच्या आंनदाला पारावार उरला नाही.भर उन्हात दिवसभर हातगाडी हाकणारा गावातील अश्विनने पन्नास टक्के गूण मिळवित बारावीची परिक्षा यशश्वीरित्या उत्तीर्ण केल्याचे कळताच अनेकांनी त्याचे अभिनंदन केले.त्याला मिळालेल्या या यशाने त्याच्यातील उत्साह पुन्हा दुणावला असून आता अधिक ताकदीने अभ्यास करून पुढील शिक्षण घेण्याचा त्याने संकल्प बोलून दाखविला.

इयत्ता सातवीत असताना पासून मी हातगाडीने समान पोहचविण्याचे काम सातत्याने करीत आहे. दरम्यानच्या काळात शिक्षणाचा कंटाळा आला. दीपस्तंभ अभ्यासिकेचे संचालक निखिल खोब्रागडे यांनी मला प्रोत्साहन दिले.आता बारावीची परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. पुन्हा एक नव्या दमाने मी शिक्षण घेणार आहे. -अश्विन मेश्राम,गोंडपिपरी