नाशिक – आदिवासींमध्ये बनावट आदिवासींकडून होणारी घुसखोरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २० मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आदिवासी बांधवांचे उलगुलान अर्थात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी दिली.

हेही वाचा – नाशिक शहरात अनधिकृतपणे वृक्षतोडीचे सत्र; दीड महिन्यात १७ गुन्हे दाखल, २३ लाखांहून अधिकचा दंड वसूल

government schemes, BJP MLA Nagpur,
भाजप आमदारांच्या मतदारसंघासाठीच सरकारी योजना आहेत का? बांधकाम कामगारांसाठी देशमुखांचा मोर्चा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Municipal bus drivers and conductors went on indefinite strike affecting peoples on Navratris first day
नवरात्रच्या पहिल्याच दिवशी ‘आपली बस’ची चाके थांबल्याने नागपूरकरांचे हाल…भाजप समर्थित संघटनेनेच…,
Distribution sweets Badlapur station, Akshay Shinde encounter,
ज्या स्थानकात आंदोलन, तिथेच आनंदोत्सव; अक्षय शिंदे चकमकीनंतर बदलापूर स्थानकात पेढे वाटप
Loksatta explained What is the new controversy with the announcement of tribal university in Nashik
विश्लेषण: नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाच्या घोषणेने नवा वाद काय?
review meeting of Congress party on Sunday evening at Rajwada Palace in Ganjipeth nagpur
नागपूर : काँग्रेसचा सर्व ६ जागांवर दावा, चेन्नीथला पटोलेंच्या उपस्थितीत आज बैठक
15 days deadline for installation of CCTV in Government Ashram Schools of Tribal Development Department nashik
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय
sangli municipal corporation
सांगली महापालिकेच्या वार्षिक अनुदानात ६६ कोटींची घट; ‘लाडकी बहीण’ मुळे अनुदानाला कात्री

हेही वाचा – नाशिक शहरात अनधिकृतपणे वृक्षतोडीचे सत्र; दीड महिन्यात १७ गुन्हे दाखल, २३ लाखांहून अधिकचा दंड वसूल

काही वर्षांत आदिवासींमध्ये बनावट जमातींची घुसखोरी वाढली आहे. यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय होत आहे. दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खऱ्या आदिवासींच्या जागी खोटे प्रमाणपत्र मिळवून बनावट आदिवासींनी नोकरीत जागा मिळवली आहे. आदिवासींची रिक्त पदांवर अद्याप भरती झालेली नाही. धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, वाढलेल्या महागाईमुळे शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या थेट लाभ हस्तांतरणात (डीबीटी) सात हजार ते आठ हजार रुपयांनी वाढ करण्यात यावी, तीन महिने अगोदर डीबीटी मिळावी, अन्यथा डीबीटी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी, पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेत वाढलेल्या महागाईमुळे १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रातील पेसा शिक्षक पदभरती आणि इतर विभागांतील पेसा पदभरती करावी, आदिवासींची २०१७ सालाची रखडलेली विशेष पदभरती करावी, कसारा घाटाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे नाव द्यावे, भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर नाव द्यावे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये केंद्रीय, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, मरांग गोमके आणि जयपालसिंग मुंडा यांचा इतिहास राज्यातील सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रमात घ्यावा. आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे विधीमंडळासमोर आंदोलन करण्याचा इशारा लकी जाधव यांनी दिला आहे.