विभागात ५३ लाभार्थी असताना केवळ १५ लाख रुग्णांनाच ‘गोल्डन कार्ड’; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची नाराजी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : आयुष्यमान भारत योजनेचे नाशिक विभागात पात्र लाभार्थी ५३ लाख ३८ हजार ८९६ इतके असताना केवळ १५ लाख ७६ हजार ५६७ रुग्णांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कार्ड वाटप करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात आरोग्य विभागासह करोना तसेच इतर विषयांचा डॉ. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला. या वेळी डॉ. पवार यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थीना गोल्डन कार्ड वाटपाचा वेग वाढविण्यास सांगितले. बैठकीत नाशिक विभागातील करोनाच्या तिसऱ्या लाटेतील वाढती रुग्णसंख्या आणि केंद्र सरकारने दिलेल्या संभाव्य रुग्णसंख्येच्या प्रमाणात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushman bharat shortcomings beneficiaries ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST