नाशिक : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीररित्या कुठलेही वक्तव्य करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाने केले आहे.

राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाइं या पक्षांनी एकत्र येत तयार केलेल्या महायुतीतील बेबनाव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उघड होत आहे. नाशिकसह अनेक मतदारसंघावर दावा सांगत सर्व पक्ष परस्परांविरोधात शड्डू ठोकून आहेत. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी युतीधर्म पाळला नाही, भाजप पदाधिकाऱ्यांना डाववले, असे आरोप अलीकडेच झाले होते. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर हक्क सांगितला. काही ठिकाणी शिवसेनेचे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटावर आगपाखड करत आहेत.

bjp candidate selection process through lottery in maharashtra
विश्लेषण : चिठ्ठीतील ‘नशीबवानां’कडे लक्ष; भाजपची उमेदवार निवडीची पद्धत राज्यात किती फायदेशीर? ती वादग्रस्त का ठरतेय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
central government onion export duty marathi news
कांदा उत्पादकांचा राग शमविण्याचा प्रयत्न, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी निर्णय
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित

हेही वाचा…वृध्द, अपंगांना मतदानासाठी घरातच केंद्रसदृश व्यवस्था; विशेष पथकांची नियुक्ती

आरोप-प्रत्यारोपांनी महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी लक्ष वेधले. नाशिक लोकसभेची जागा आपल्याच पक्षाला मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे हेवे-दावे, आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. उमेदवाराच्या विजयासाठी हे चित्र घातक ठरण्याची शक्यता आहे. उमेदवारीबद्दल महायुतीचे नेते योग्य निर्णय घेतील. पुढील काळात विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकीतही एकत्रितपणे महायुतीला सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन कोणीही पदाधिकाऱ्यांनी लोकसभा उमेदवारीविषयी जाहीरपणे वाच्यता करू नये असे आवाहन टिळे यांनी केले आहे.