लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सोमवारी संध्याकाळी वादळी पावसामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Kalammawadi dam, Radhanagari, flood,
राधानगरी, काळम्मावाडी धरणातील विसर्ग वाढल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर
It is feared that most of the villages will be affected by the development projects in Thane district even during the rainy season
ठाणे जिल्ह्यात ‘समृद्धी’ने पुराची अवकळा
kolhapur flood
पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; रस्ते बंद, एसटी सेवेवर परिणाम
Heavy Rains, Heavy Rains in yavatmal, Bembla Dam, Bembla Dam Gates to Open as Water Levels Rise, Bembla Dam Gates open, heavy rains in bembla dam, marathi news,
यवतमाळात मुसळधार पाऊस, बेंबळा धरणाचे चार दरवाजे उघडले
Union Minister Prataprao Jadhav, Prataprao Jadhav Inspects Severe Crop Damage, Prataprao Jadhav Inspects Severe Crop Damage in khamgaon tehsil, khamgaon tehsil Buldhana,
अतिवृष्टीचे तांडव! खामगावात ८३८ हेक्टर जमीन खरडली,२४२ कुटुंब बाधित…
buses, canceled, water,
मुसळधार पावसाने डहाणू बस स्थानक आणि आगारात पाणी घुसल्याने अनेक बस रद्द, प्रवाशांचे हाल
Kolhapur, heavy rain in kolhapur, Heavy Rain Lashes Kolhapur District, Panchganga River Overflow, Kolhapur news,
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; ‘पंचगंगे’चे पाणी पात्राबाहेर
transport system in kolhapur district affected due to heavy rain
कोल्हापुरात पावसामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा

यावर्षी वातावरणातील बदलामुळे आधीच आंबाबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना प्रयत्न करुन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ३० ते ४० टक्के बागा वाचविण्यात यश आले होते. सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या गळून पडल्या. हरसूलसह ठाणापाडा, निरगुडे, खरशेत, दलपतपूर, तोरंगण, चिरापाली, चिंचवड, जातेगाव तसेच दुर्गम भागात खरवळ, आडगाव (देवळा), गावठा, शिरसगाव, मुरंबी या गावांमध्ये नुकसान झाले.

आणखी वाचा-नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी

ठाणापाड्यातील सामाजिक कार्यकर्ते जयराम भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत. प्रत्येकाने नुकसानीचे फोटो काढून कृषी आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागील वर्षीही या परिसरात अवकाळी आणि वादळामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु, अल्प शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. काही त्यापासून वंचित राहिले.