नाशिक – कसारा ते इगतपुरी दरम्यान घाटात मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे मार्गावर सायंकाळी मालगाडीचे सात डबे घसरल्याने प्रवासी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर रोखून धरण्यात आल्या. कल्याण आणि इगतपुरी स्थानकावरील दुर्घटना सहायता गाडी अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> जळगावात तरुणाचा खून; दोन जण जखमी

mumbai road traffic, mumbai Heavy Rain Live Updates, mumbai Rain alert today in marathi,
Mumbai Rain Update : रस्ते वाहतूक कोलमडली
Konkan Railway, monsoon, heavy rain, konkan
विश्लेषण : पावसाळ्यात कोकण रेल्वे पुन्हा बेभरवशाची का ठरली?
Heavy Rains Disrupt Konkan Railway Services, konkan railway, Konkan Railway Services, ST Buses Deployed for Stranded Passengers, st bus for Stranded Passengers in konkan railway,
कोकण रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना एसटीचा आधार, विशेष बस सोडण्यात आल्याने दिलासा
Konkan Railway Services Disrupted, Pedne Malpe Tunnel Floods, Trains Cancelled and Rerouted on konkan railway, konan railway, heavy rain in konkan railway affected, marathi news,
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात पुन्हा पाणी भरले; चार रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले
Due to heavy rain in Mumbai impact on railway traffic Trains via Nagpur cancelled
मुंबईत पूर, नागपूरमार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना फटका, अनेक गाड्या रद्द
Manmad to Mumbai railway traffic disrupted
पावसामुळे मनमाड-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत; अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या माघारी
train services between kalyan and kasara are disrupted
एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवरा, वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवरून माती गेली वाहून
Traffic, Kalyan West railway station,
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहन कोंडीने प्रवासी हैराण

रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कसारा घाटातील एका मार्गावर ही दुर्घटना घडली. मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. कसारा ते इगतपुरी दरम्यान घाटात तीन रेल्वेमार्ग आहेत. मालगाडी कसाऱ्याहून इगतपुरीकडे येणाऱ्या मार्गावरून घसरली. त्यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम घाटातील मध्य मार्गावर झाला असून तो मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरू आहे. या अपघाताचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. परंतु, मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-हावडा, अदिलाबाद-नंदीग्राम, मुंबई-गोंदिया विदर्भ, मुंबई-मनमाड-पंचवटी, मुंबई-नांदेड, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड अशा एक्स्प्रेस उंबरमाळी, घाटकोपर, विक्रोळी आदी विविध स्थानकांवर रोखून धरण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यात मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. अमरावती, हावडा, सिकंदराबाद, शालिमार, वाराणसी, पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्याही वळविण्यात आल्या आहेत. कल्याण स्थानकापलीकडे असणाऱ्या चार गाड्या वळवल्या जाऊ शकत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.