नाशिक येथील राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पडताळणी एनसीईआरटीचे अध्यक्ष डॉ. बी. पी. भारद्वाज यांनी करून समाधान व्यक्त केले.
हेही वाचा- “अरे तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का?” भर पत्रकार परिषदेत संजय राऊत पत्रकारावर भडकले
देशातून २६ नावीन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी मुली केंद्रातील जिल्हा परिषद भातोडे शाळेच्या “ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गणित संबोध सुलभ होण्यासाठी अबॅकस चा वापर” या नावीन्यपूर्ण उपक्रमाची निवड झाली आहे. दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे या उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन लाभले. एनसीईआरटी दिल्लीद्वारा आयोजित ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस अँड एक्सपेरीमेंट्स इन एज्युकेशन’ या स्पर्धेमध्ये भातोडे शाळेतील उपशिक्षिका ज्योती अहिरे यांनी यांनी सादर केलेल्या नवोपक्रम आराखड्याची निवड करण्यात आली.
हेही वाचा- “ आपल्याला मोठ्या मैदानात लवकरच खेळावं लागणार आहे” संजय राऊतांचं नाशिकमध्ये सूचक विधान!
संपूर्ण देशभरातून स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून या एकमेव नवोपक्रमाची निवड झाली आहे. एनसीईआरटीचे अध्यक्ष डॉ. भारद्वाज यांनी शाळेस भेट देऊन उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. समवेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डी. डी. सूर्यवंशी, केंद्रप्रमुख किसन पवार, विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, मुख्याध्यापक उत्तम गायकवाड, शिक्षिका ज्योती आहिरे तसेच शिक्षक, शाळाव्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.