पनवेल – पनवेल तालुक्यातील वलप गाव ते तळोजा औद्योगिक वसाहतीला जोडणा-या पुलाचे बांधकाम सुरू होते. सोमवारी कोसळणा-या मुसळधारांमुळे या पुलावरुन पाणी गेले. हा पुल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराने सेंट्रींगचा मनोरा बांधला होता. पावसाच्या पाण्यात हा मनोराच वाहून गेल्याने पावसात या पुलाचे बांधकाम अजून रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वलप गावाशेजारील गणेशनगर येथील पुल जिर्ण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पुल बांधण्यासाठी कंत्राटदार नेमला होता. संथगतीने हे काम होत असल्याचा आरोप शेकापचे नेते काशिनाथ पाटील यांनी केला आहे. पुलाच्या बांधकामासाठी उभारलेला बांधकामाचा मनोरा वाहून गेल्याने पुलाचे काम कधी पूर्ण होईल याबाबत साशंकता आहे.