नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळापूर्व छाटणी करण्यात येते. यंदा धोकादायक वृक्ष सर्वेक्षणालाच जून महिना उजाडला असून शहरात यंदा १७३ धोकादायक झाडांपैकी आतापर्यंत अवघी २३ झाडे तोडण्यात आलेली आहेत. आद्यप धोकादायक झाडे पूर्णपणे तोडली नसल्याने पावसाळ्यात यांचीच पडझड होत आहे का? यानिमित्ताने असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

पावसाळा सुरू झाला की शहारत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नित्याच्याच असतात. त्यासाठी महापालिका धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन पावसाळा पूर्वीच छाटणी केली जाते. दरवर्षी मे महिन्यातच धोकादायक वृक्ष सर्वेक्षण पूर्ण होऊन मे अखेरपर्यंत छाटणी ही पूर्ण केली जाते. मात्र यंदा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात झाडांची तोडणी करू नये अशी मागणी केली होती, त्यामुळे महापालिकेने धोकादायक वृक्ष सर्वेक्षण आणि छाटणीला उशिराने सुरुवात केली अशी माहिती उद्यान विभागाने दिली आहे.

हेही वाचा >>>पनवेल : ‘तो’ सूतळी बॉम्ब इमारतीमधील ६८ वर्षीय रहिवाशाने ठेवला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोकादायक वृक्ष सर्वेक्षणाला उशीर झाला असून सर्वेक्षण पूर्ण झाले असून शहारत एकूण १७३ झाडे धोकादायक परिस्थितीत आढळून आली आहेत. तेच मागील वर्षी १४३ धोकादायक झाडे होती. यामध्ये सर्वाधिक धोकादायक झाडे ही बेलापूर मध्ये आहेत , बेलापूर मध्ये ६५ धोकादायक झाडे असून त्यापैकी १४ झाडे तोडली आहेत. त्यांनतर नेरुळ ,वाशी, घणसोलीचा नंबर लागतो. नेरुळ मध्ये ३२पैकी ६, वाशीत २६ आणि घणसोलीमध्ये २१ पैकी एका ही झाडाची छाटणी झालेली नाही. आतापर्यंत केवळ २३ झाडे तोडण्यात आली असून उर्वरित लवकरच तोडण्यात येतील अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली आहे.