लोकसत्ता प्रतिनिधी

रण : लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उरणच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मागणीसाठी बैठक घेत निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आहे. चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे १०० हून अधिक शेतकरी कुटुंबांच्या २५० एकर जमिनीवर खारफुटीमुळे नापिकी झाली आहे. तर दुसरीकडे सीआरझेड लागू असल्याने ही जमीन हातची गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने हा बहिष्कार घातला आहे.

Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील अगतिकता
mira Bhayandar , BJP, Narendra Mehta, assembly elections, Mira Road, internal disputes, Gita Jain, Ravi Vyas, election candidacy, former MLA, BJP workers, mira bhayandar news,
नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
peoples representatives hold discussions with officials to follow up on various problems in municipal departments before elections
निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी पालिकेच्या दारी, विभागातील विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा
Scrutiny of candidates by Sharad Pawar group against Minister Dharmarao Baba Atram
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी
Thane, Uddhav Thackeray, Uddhav Thackeray meeting in Thane, bhagwa saptah, Shiv Sena split, assembly elections,
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उद्या उद्धव ठाकरेंचा ‘भगवा सप्ताह’, विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची सप्ताह मोर्चेबांधणी

शेतजमिनीवर कांदळवन आले असून त्याची शहानिशा ने करता सी.आर.झेड.मध्ये दाखविल्याने स्वत:च्या मालकीची शेती असूनसुद्धा शेतकरी (मालक) ही जमीन कोणाला विकू शकत नाही तसेच या क्षेत्रात कोणतेही पीक घेऊ शकत नाही. अशा गंभीर समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. परिणामी स्वत:च्या मालकीची शेती असूनही येथील शेतकरी स्वत:च्या मूलभूत न्याय्य हक्कापासून वंचित राहिला आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ‘एपीएमसी’त फलक कायम

येथील शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर, कोंढरीपाडा, करंजा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चाणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या न सुटल्याने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर एकमताने बहिष्कार टाकून निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

५० ते ६० वर्षांपूर्वी मौजे चाणजे खाडीतील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती, परंतु कालांतराने बंदिस्त तुटत गेल्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत येऊ लागले परिणामी येथील शेतजमिनीत खारफुटीचे अतिक्रमण होत गेले. अनेक वृक्षांचे, कांदळवनांचे शेतात अतिक्रमण झाले. अशा प्रकारे मौजे चाणजे येथील शेतजमीन समुद्राच्या पाण्याखाली आणि खारफुटीखाली गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनी शेतकऱ्यांना शासनाने शेती म्हणून परत करा या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याची माहिती चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली आहे.