उरण : पावसाळा सरल्याने पाण्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात उन्हामुळे धूळ निर्माण झाली आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे करोना नंतर पुन्हा एकदा तोंडाला मुखपट्टी(मास्क) लावून प्रवास करण्याची वेळ आली आहे. उरण तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरून दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. या वजनी वाहनांच्या तुलनेत बांधलेले रस्ते हे कमकुवत व हलक्या दर्जाचे आहेत. त्यामुळे रस्ता तयार केल्या नंतर काही महिन्यांतच या रस्त्यांना भले मोठे खड्डे पडतात. पावसाळ्यात तर या खड्ड्यात अधिकची भर पडते. त्यामुळे हे खड्डे मोठे होत जातात.

हेही वाचा : Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं

139 passengers died after falling from the local train in three months
लोकलमधून पडून तीन महिन्यांत १३९ बळी ; रखडलेले प्रकल्प, मर्यादित फेऱ्यांमुळे जीवघेण्या प्रवासाची वेळ
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

ते वेळेत न बुजविल्याने रस्त्यावर खड्ड्याची संख्या वाढते. परिणामी खड्डेच रस्ते बनतात. अशी स्थिती उरण मध्ये आहे. यामध्ये उरणच्या द्रोणागिरी, खोपटा कोप्रोली, चिर्ले दिघोडे तसेच उरण पनवेल मार्गावरील नवघर ते बोकडवीरा व खोपटे पूल ते राष्ट्रीय महामार्ग हा कोस्टल रस्ता यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडून त्यातील खडीची धूळ निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील खड्ड्या नंतर प्रवासी व नागरिकांना आता धुलीकणांचा सामना करावा लागत असून याचा परिणाम श्वसनाचे आजार बळावण्यात झाला असून तातडीने रस्त्यावरील खड्डे भरावेत अशी मागणी उरण मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष घरत यांनी केली आहे.