उरण : जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत चालणाऱ्या जेएनपीए जलसेवेत पावसाळ्यातील वातावरणामुळे बदल करण्यात आला आहे. ही सेवा आता जेएनपीए ते भाऊचा धक्का दरम्यान राहणार आहे. पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत हा बदल राहणार आहे.

जेएनपीए बंदरातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जेएनपीए ते मुंबई दरम्यान प्रवास करता यावा यासाठी जेएनपीएने स्वतःची जलसेवा सुरू केली आहे. बंदरावर आधारित पाच खासगी बंदर आणि बंदराच्या कामगार वसाहतीत वास्तव्य करणारे नागरिक सध्या या सेवेचा लाभ घेत आहेत.

ही सेवा जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ इंडिया अशी चालविण्यात येते. मात्र पावसामुळे खवळलेला समुद्र आणि त्यामुळे जलप्रवासातील धोके लक्षात घेऊन ही सेवा गेटवे ऐवजी भाऊचा धक्कापर्यंत सुरू केली जाते. त्यामुळे मोरा-मुंबई प्रमाणेच जेएनपीए जलसेवा ही पावसाळ्यातही सुरू आहे. मात्र पावसाळ्यातील वादळी वारे आणि खराब हवामानामुळे या सेवेत बदल करण्यात आला आहे.

जेएनपीए ते गेट वे जल सेवेत बदल करण्यात आला असून हा बदल पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी आहे. यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा सेवेत बदल असेल मात्र हवामानातील बदल झाल्यास याच मार्गावर सुरू राहतील. – कॅप्टन बाळासाहेब पवार, जेएनपीए वाहतूक विभाग

बंदरावर आधारित पाच खासगी बंदर आणि बंदराच्या कामगार वसाहतीत वास्तव्य करणारे नागरिक सध्या या सेवेचा लाभ घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.