लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: घनकचरा व्यवस्थापनातील कच-याची विल्हेवाट हा एक अत्यंत महत्वाचा घटक असून तुर्भे एमआयडीसी परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेचा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा देशातील एक उत्तम प्रकल्प म्हणून नावाजला जातो. तथापि स्वच्छता ही नियमीत करण्याची गोष्ट असून स्वच्छता प्रक्रियेत अधिकाधिक सुधारणा करणे गरजेचे आहे या भूमिकेतून नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर शहर स्वच्छतेप्रमाणेच घनकचरा विल्हेवाटीकडेही बारकाईने लक्ष देत आहेत. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच द्यावा असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner rajesh narvekar appeals to citizens to separate wet and dry waste mrj
First published on: 26-03-2023 at 19:30 IST