नवी मुंबई: मोबाईलसारखी वस्तू चोरी झाली आणि ती परत मिळाली अशी घटना क्वचित घडते. मात्र गेल्या काही दिवसांतील कारवाईमुळे कोपरखैरणे पोलिसांनी ५० मोबाईल जप्त केले असून हेच मोबाईल सोमवारी पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते मूळ मालकांच्याकडे सुपुर्त करण्यात आले.

परिमंडळ एकचे पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस क्षेत्रात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ मोबाईल फोनबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला. मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. कोपरखैरणे पोलीस पथकाने पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी पुनः तपासणे सुरू केले. 

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

हेही वाचा : नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

मोबाईलचा तांत्रिक तपास करून भारतातील विविध राज्यांतून एकूण ५० मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत. याच मोबाईलचे मुळ मालकांना वाटप केले गेले. आज या ५० पैकी २८ मोबाईल मालक आले होते. त्यांना त्यांचे त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी दिली.