लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : नवघर उड्डाणपूल उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या पुलामुळे पूर्व व पश्चिम हे विभाग जोडले जातात. मात्र मागील अनेक महिन्यांपासून नवघर उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे पुलावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पुलावर अंधारही आहे.

IVF, infertility, artificial insemination, Aditya Birla Memorial Hospital, Oasis Fertility, World IVF Day, technology advancements, success rate, assisted hatching, embryoscope, gametes activation, microfluids, pre genetic testing, pune news, latest news, loksatta news,
कृत्रिम गर्भधारणेकडे वाढतोय ओढा, बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाच्या समस्येत वाढ; जोडप्यांची आयव्हीएफला पसंती
heavy rain, thane district, Barvi Dam, storage, 60 percentage
बारवी धरण ६० टक्के भरले, २४ तासांत ६ टक्क्यांची वाढ
runde bridge near Titwala under water due to heavy rain
मुसळधार पावसामुळे टिटवाळाजवळील रूंंदे पूल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला
debris use filling in potholes, apmc market vashi, Hindering Traffic Flow , APMC market Vashi, Potholes, Traffic obstruction, Grain market, Spice market Road, navi mumbai, latest news, marathi news,
नवी मुंबई : मसाला बाजारात राडारोडा टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार
Only 35 percent of BEST fleet is self owned Mumbai
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या
tiger
Video: बछड्यांसह वाघीण निघाली ऐटीत….पण, भररस्त्यात असे काही घडले की चवताळून थेट पर्यटकांवर…
Mumbai, dam storage,
मुंबई : धरणसाठ्यात वाढ, पाणीसाठा १८ टक्क्यांवर
traffic, mumbai, rain, vehicle,
Mumbai Rains : पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली, ठिकठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम

पावसामुळे पुलाच्या कडेला व दुभाजकावर झाडेझुडपेही वाढली आहेत. या झुडपांमुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही. अशा अनेक समस्यांना या उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

आणखी वाचा-उरण : मोरा सागरी पोलीस ठाण्याचे काम निधीअभावी अपूर्णच

उरण-पनवेल महामार्गावरील फुंडे येथील साकव नादुरुस्त झाल्याने उरण तसेच द्रोणागिरी नोड या औद्याोगिक विभागामध्ये ये-जा करणारी प्रवासी व जड वाहने याच उड्डाणपुलाचा वापर करीत आहेत. पुलाच्या द्रोणागिरी नोड व उरण-पनवेल मार्ग या दोन्ही बाजूने खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांतील धुळीचाही सामना करावा लावत आहे. खासकरून या पुलाशेजारीच असलेल्या तुकाराम हरी वाजेकर विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी याच पुलावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे नवघर येथील उड्डाणपुलाची दुरुस्ती त्याचप्रमाणे विजेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-पेव्हरब्लॉक बसवण्यापूर्वीच खड्डे, पदपथाच्या स्लॅबला मोठी छिद्रे; कोपरखैरणे सेक्टर १५-१६ मधील प्रकार

सिडकोचे सातत्याने दुर्लक्ष

या उड्डाणपुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही सिडकोची असून नवघर येथील नागरिकांनी मागणी करूनही सिडकोकडून दुर्लक्ष केले जात. सिडकोकडे सातत्याने मागणी करूनही सिडकोचे अधिकारी नवघर पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती नवघर येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश घरत यांनी दिली आहे.