नवी मुंबईतील दोन विविध घटनांत दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. विहार तलावामध्ये आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.
दिघा येथील खोपड तलावामध्ये मित्रांसोबत रंगपंचमी खेळून आंघोळीला गेलेले सुनील साळुंके (४१) हे पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत सुमारे ३० ते ३५ जण अजून या तलावात पोहत होते. साळुंके यांनी मद्य प्राशन केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर दुसऱ्या घटनेत इलटन पाडा येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या काठावर २५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला. या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान मुंबईतील विहार तलावात गुरुवारी दुपारी एक ३२ वर्षे वयाचा तरुण बुडाला असून संजय बन्सीधर दास असे या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. आता शुक्रवारी सकाळी शोध मोहिम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
तिघांचा बुडून मृत्यू
दिघा येथील खोपड तलावामध्ये मित्रांसोबत रंगपंचमी खेळून आंघोळीला गेलेले सुनील साळुंके (४१) हे पाण्यात बुडाले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 25-03-2016 at 00:44 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people drowned in lake