पनवेल :  पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्राधिकरण जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात वाहनांची येजा करण्यासाठी रुंद रस्ते नसल्याने अपघातांचे सत्र सूरुच आहे. मागील दोन दिवसांमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू तर तीनजण जखमी झाल्याची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहेत.  नैना प्राधिकऱण क्षेत्रात अद्याप रस्त्यासारखी पायाभूत सुविधांची कामे सिडको मंडळाने हाती घेतली नाही. त्यामुळे रस्त्यांवर अपघात होणे हे नित्याचे झाले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra 12th HSC Results 2024: पनवेल तालुक्यातील ९७.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Pune, heavy rain, Regional Transport Office, vehicle tests, Vehicle Aptitude Certificate, Learner s Driving Permit, Permanent License, Dive Test Ground, Alandi Road Test Ground, schedule change, marathi news
पुणे : पावसामुळे आरटीओच्या कामकाजावर पाणी! जाणून घ्या लायसन्ससह इतर चाचण्यांचे बदललेले वेळापत्रक…
loksatta analysis how rising of food inflation affect country s economy and credit system
विश्लेषण : उफाळलेल्या खाद्यान्न महागाईचा कर्जहप्त्यांशी काय संबंध?
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
Thane Municipal Commissioner information about the measures to solve the traffic jam
मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत, पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू
health systems, Pune, laxity, health,
शहरबात : आरोग्य यंत्रणांमध्ये सुस्तावलेपणाची साथ
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
Arm mobile app will work for information about accidental death of wild animals
वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूच्या माहितीसाठी काम करणार ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप
AIIMS Nagpur, AIIMS Nagpur Expands Medical Services, Heart and Liver Transplants in AIIMS Nagpur, All India Institute of Medical Sciences, nagpur AIIMS, Nagpur news, marathi news,
उत्तम उपचारामुळे ‘एम्स’कडे ओढा वाढला.. मूत्रपिंडानंतर हृदय, यकृत प्रत्यारोपणही…

अरुंद रस्त्यांमुळे वाहनांची ठोकर होणे आणि अपघातांमुळे भांडणाचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता हरिग्राम ते केवाळे या गावादरम्यान एका रिक्षाच्या अपघातामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला तर दोनजणी जखमी झाल्या. रिटघर गावातील नागूबाई भगत या घरी परतत असताना अपघातामध्ये त्यांनी जीव गमावला. या अपघातामध्ये रिक्षाचालकाने एका भिंतीला ठोकल्याने हा अपघात घडला. रिक्षातील प्रवासी दूंदरे गावातील जयश्री माळी व केवाळे गावातील आनंती नागुडांगरकर या सुद्धा जखमी झाल्या. तसेच दूस-या घटनेत सोमवारी दुपारी पावणेचार वाजता हरिग्राम गावालगत साई एकविरा धाब्यासमोर खानाव येथे राहणारे शूभम व आदित्य पाटील हे दोघे दुचाकीवरुन प्रवास करत असताना भरधाव इरटीगा मोटारीने दुचाकीच्या उजव्या बाजूला धडक दिली. या अपघातामध्ये शुभमच्या पायाला जबर मार लागला. सध्या ग्रामीण पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने येथील पायाभूत सुविधा सिडको मंडळाने तातडीने उभाराव्यात अशी मागणी गावक-यांकडून होत आहे.