नवी मुंबई : स्लॅबचा मोठा भाग पडून दोन वृद्धांचा जीव थोडक्यात अचला आहे. सिडको कालीन असणाऱ्या नेरुळ येथील विश्वशांती सोसायटीतील ध रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. सोसायटी धोकादायक घोषित करण्यात आली आहे. सोसायटी पूर्ननिर्माण प्रकरणी एकवाक्यता न येणे आणि लाल फिती कारभाराने प्रकल्प राखडला असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.
नेरूळ सेक्टर ८ मधील विश्वशांती सोसायटी मध्ये सदनिका क्रमांक ए ७ इमारत २७ या घरत शुक्रवारी रात्री प्राजक्ता पाटील यांच्या घरात छाताच्या स्लॅबचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने दोन वृद्धांचा जीव वाचला आहे. मात्र ७० वार्षीय आजी जखमी झाली आहे. घरातील हॅाल मध्ये डोक्यावर असलेला स्लॅब अचानक कोसळल्याने घरातील फॅन पु्र्ण पणे वाकलेला होता. सिडको निर्मित असलेल्या या इमारतींला ४० वर्ष झाली असून सद्या ही इमारत धोकादायक परिस्थित पोचली आहे. महानगर पालिकेने अतिधोकादायक इमारतीमध्ये या सोसायटीचा समावेश करूनही अद्याप येथे लोक राहत आहेत. येथील सोसायटी कमिटी मध्ये असलेला वाद आणि महानगर पालिकेच्या बोटचेपी धोरणामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या २१० कुटूंबांचीटा जीव टांगणीला लागला आहे. या घटने नंतर इमारतीचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे. इमारतीतील रहिवाशांना घर रिकामे करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आता पाणी पुरवठा, महावितरण यांनाही सेवा स्थगित करण्यास सांगितले आहे. अशी माहिती परिमंडळ एक उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी दिली.