घणसोली येथील सिडको निर्मिती मेघमल्हार गृहसंकुलात पाणीबाणी समस्या निर्माण झालेली आहे . या संकुलातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस) मधील ५ आणि एलआयजी १ इमारतींना २४ तासात केवळ १ तासच पाणी मिळत असल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संकुलातील नागरीकांनी संकुल आवारात अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आवाज उठवत शिर्के बिल्डरच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.तळोजा येथे ही सिडकोने बांधलेल्या गृहसंकुलात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या उद्भवत आहे. आता घणसोली येथील ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस) मधील नागरिकांना अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठयाने ग्रासले आहे.

मेघमल्हार गृहसंकुलात गेल्या एक वर्षांपासून नागरी वस्ती वाढली आहे. मेघमल्हारला करिता ३ पाण्याच्या टाकी बसवण्यात आलेल्या आहेत. एल १ ते एल ९ याकरिता २ टाकी उपलब्ध आहेत , तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस)च्या ५ इमारती आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) मधील १ इमारत अशा ६ इमारतींकरिता केवळ एकच टाकी उपलब्ध आहे. त्यातही याठिकाणी दर १५ दिवसांनी पाण्याची समस्या भासते अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे. गणेश चतुर्थी पासून या संकुलात केवळ १ तास पाणी येत असून ते ही अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. सिडकोने नियोजन करताना पाण्याचे सुनियोजन करण्यात आलेले नाही अशी ओरड येथील रहिवाशांमधून होत आहे. नवी मुंबई शहराला स्वतः च्या मालकीचे धरण आहे. नवी मुंबई शहरातील घणसोली विभाग हा विकसित झालेला आहे. अशा शहरात आजही नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे , ही मोठी शोकांतिका आहे.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

हेही वाचा : नवी मुंबई : घरफोडीतील सराईत आरोपीस अटक ; ६० तोळ्यांचे दागिने जप्त

सिडको निर्मिती मेघमल्हारमधील ईडब्ल्यूएसच्या ५ इमारती आणि एलआयजीची १ इमारत अशा ६ इमारतींना पाण्याची केवळ एकच टाकी उपलब्ध आहे. त्यात आणखीन भर म्हणजे नियमितपणे पाण्याचा पुरवठा होत नसून अवेळी अवघे एक तास पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आम्हा रहिवाशांना भीषण पाणी टंचाई भासत आहे. – खुशबू मुधोळकर, मेघमल्हार रहिवासी, घणसोली