पाण्याचे अनेक गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. तसे पाण्याचे सर्वच गुणधर्म महत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे, या पृथ्वीतलावरील जीवनासाठी गरजेचे! त्यातल्या दोन महत्त्वाच्या गुणधर्माविषयी जाणून घेऊ या. पहिला म्हणजे पाण्यामध्ये अनेक रसायने किंवा सोप्या भाषेत पदार्थ; सहजी विरघळतात. दुसरा गुणधर्म म्हणजे पाण्याची उष्णता धारण करण्याची क्षमता खूप जास्त आहे. म्हणजेच पाणी बरीच उष्णता शोषून घेते आणि शोषलेली उष्णता सहजासहजी बाहेर सोडत नाही. पाण्याला गरम आणि थंड व्हायला वेळ लागतो. विविध पदार्थ सामावून घेण्याची पाण्याची क्षमता, तापमानाबरोबर वाढते. म्हणजे गरम पाण्यात बरेच पदार्थ अधिक सहजी विरघळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे दोन गुणधर्म परिणामकारकरीत्या एकत्र आल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला निसर्गात अनुभवायला मिळते, ते उष्ण पाण्याच्या झऱ्यांच्या रूपात! निसर्गत: गरम झालेल्या पाण्याच्या झऱ्यांविषयी, आपण ऐकले असे किंवा असे झरे पाहिलेही असतील. उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान करावे, म्हणजे त्वचेचे अनेक विकार, रोग बरे होतात, असेही कोणी म्हटल्याचे आपण ऐकले असेल.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mansi rajadhyaksha hot springs life on earth amy
First published on: 05-12-2022 at 01:01 IST