पालघर, वसई तालुक्यांतील अनेक गावांचा समावेश

पालघर :  मुंबई-अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधित होत असलेल्या गावांमध्ये नॅशनल हायस्पीड रेलकॉपोरेशन लि. ( NHSRCL) सामाजिक उत्तरदायित्य ( CSR) फंडामधून पालघर जिल्ह्यातील प्रकल्पाबाधित गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी गाव उत्तरदायित्व फंडामधून एक कोटी २० लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे.

पालघर तालुक्यातील विराथन खुर्द, हनुमान नगर, पडघे, रोठे, अंबाडी आणि वसई तालुक्यातील नागले, पोमण आणि चंद्रपाडा ग्रामपंचायतीला पहिल्या टप्प्यामध्ये निधीचे वितरण  करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी पालघर डॉ. माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.  नॅशनल हायस्पीड रेलकॉपोरेशन लि. मार्फत पूढील टप्प्यात बुलेट ट्रेन मार्गिकेमधील उर्वरित गावांना विकासनिधी मंजूर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

विकासकामांचा तपशील

  • विराथनखुर्द : ग्रामपंचायत ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रोड काँक्रीटीकरण- २५ लाख रुपये
  • हनूमान नगर : जिल्हा परिषद शाळा हनूमान नगर येथे वर्ग खोली बांधणे- १४ लाख रुपये
  • पडघे : ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेड बांधकाम – १० लाख रुपये
  • रोठे (मायखोप): रामचंद्र पाटील कला मंदिर स्टेज रस्ता डांबरीकरण करणे – १५ लाख रुपये
  • अंबाडी (शेलवाली): समाजमंदिर बांधणे व गावमंदिर सिमेंट रस्ता काँक्रीटीकरण –  १५ लाख रुपये
  • नागले :  फणसपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था – १५ लाख रुपये
  • पोमण : सोलर हायमास्क उभारणी करणे –  १३ लाख रुपये
  • चंद्रपाडा : पत्र्याचे छत व संरक्षण भिंत बांधणे – १४ लाख रुपये