पालघर : पालघर पंचायत समिती अंतर्गत तारापूर व उमरोळी या ठिकाणी घोषित झालेल्या पोटनिवडणुकीसाठी संबंधित राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधला गेल्याने या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. तारापूर गणामध्ये स्मिता कामद पवार यांचे १३ मार्च २०२३ रोजी निधन झालेल्या रिक्त पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने त्यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी किमया कामाद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमरोळीचे पंचायत समिती सदस्य विनोद कृष्णा भावर यांची ऑक्टोबर 2022 मध्ये बिरवाडी सरपंच म्हणून नेमणूक झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती या पदावर बहुजन विकास आघाडी तर्फे महेश दामू लडे यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : बोईसर : तारापूरच्या प्रदूषणाविरोधात खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Confusion in Lok Sabha due to Parliamentary Affairs Minister
संसदीय कामकाज मंत्र्यांमुळेच लोकसभेत गोंधळ
Mav leaders bjp Campaigning convention ajit pawar mahayuti
मविआ नेते लक्ष्य; भाजप अधिवेशनात प्रचाराची दिशा स्पष्ट, ‘संभ्रमा’तील कार्यकर्त्यांना संदेश
Congress has also prepared a list of spokespersons to face the BJP
भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रवक्त्यांची फौज
fadanvis
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
Pankaja Munde maharashtra legislative councile
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
eknath shinde and ajit pawar
महायुक्तीचा संकल्प! अजितदादांच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांचा हात; सर्व समाजघटकांसाठी घोषणांचा वर्षाव

नव्याने नेमणूक होणाऱ्या पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अवघ्या वर्षभराचा राहणार असल्याने बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही पोटनिवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाला सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य लाभल्याने दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे दिसून आले आहे. उमेदवारी अर्ज यांची छाननी उद्या झाल्यानंतर याबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे.