-
पनवेल येथील खारपाडा गावाजवळ पनवेल ते कासू या ४२ किलोमीटर रत्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
-
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाचे हे चौथे भूमिपूजन ठरले आहे.
-
भूमिपूजन झाल्यावर रत्नागिरीला जातांना हेलिकॉप्टरमधून मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी करत आढावाही घेतला.
-
या महामार्गासाठी ४० वेगवेगळ्या बैठका झाल्या, यंदा वर्षअखेरपर्यंत ८४ किलोमीटर कॉंक्रीटीकरणाचे काम पुर्ण होईल असे आश्वासन यावेळी गडकरी यांनी दिले.
-
कोकणाच्या रखडलेल्या महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते अशी उपरोधिक टीकाही यावेळी गडकरी यांनी कार्यक्रमादरम्यान केली.
-
रखडलेल्या कामाचे दु:ख असून या महामार्गाच्या बांधकामाविषयी काही बोलण्यासारखे आहे, मात्र काही सांगण्यासारखे नाही अशी भावनाही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.
-
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची सूरुवात १३ वर्षांपुर्वी केली होती.
-
महामार्गातील भूसंपादन,पर्यावरण विभागाची परवानगी आणि महामार्ग बांधणा-या ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या महामार्गाचे काम रखडले.
-
या महामार्गाच्या कामाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाची सुधारित किंमत १५,५६६ कोटी रुपये असून ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेस ९९% काम पूर्ण झाले आहे.
-
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ पॅकेजेस असून यापैकी २ पॅकेजेसचे ९२% व ९८% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तर दोन पॅकेजेससाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.
-
रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेसचे ९३% व ८२% काम पूर्ण झाले आहे. एका पॅकेजचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे. ( सर्व छायाचित्रांसाठी सौजन्य – @nitin_gadkari )

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच