सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत काँग्रेसच्या या आश्वासनाचा जनतेवर खास प्रभाव पडल्याचे दिसत नाहीये.

लोकांसाठी शेतकरी कर्जमाफी जवळचा विषय

काँग्रेसच्या जातीनिहाय जनगणनेच्या आश्वासनाबद्दल जनतेला काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने साधारण आठ दिवस उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील महाकौशल भागात लोकांशी बातचित केली. मात्र, या भागातील मोजक्याच लोकांनी जातीनिहाय जनगणना हा राजकीय मुद्दा आहे, असे मत व्यक्त केले. याउलट शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा अनेक मतदारांना जवळचा वाटतो. सत्तेत आल्यास छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी दिले आहे. कुर्मी आणि साहू जातीतील मतदारांनी या निवडणुकीत जातीआधारित विचार न करता एक शेतकरी म्हणून कर्जमाफीच्या मुद्द्याला महत्त्व दिल्याचे दिसते.

pm modi to inaugurate 1st underground metro
पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पांचे लोकार्पण; मुंबईकरांच्या सेवेत पहिली भुयारी मेट्रो, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Siddaramaiah
Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना MUDA प्रकरण भोवणार? राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने सिद्धरामय्या अडचणीत
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध
The state government plans to start work on ambitious projects in the state before the implementation of the code of conduct for assembly elections
४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार

जातीआधारित जनगणनेच्या मुद्द्याला काँग्रेसकडून महत्त्व

काँग्रेसने सत्ता आल्यास जातीनिहाय जनगणना करण्यात येईल, असे आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी या महत्त्वाच्या नेत्यांनी हाच मुद्दा लावून धरल्याचे दिसत आहे. भाजपाने मात्र या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. २ नोव्हेंबर रोजी भाजपाचे नेते अमित शाह छत्तीसगडमध्ये बोलताना “भाजपाने जातीआधारित जनगणनेला कधीही विरोध केलेला नाही, मात्र याबाबतचा निर्णय पूर्ण विचार करूनच घेतला पाहिजे”, अशी भूमिका शाह यांनी मांडली. दरम्यान, भाजपाने छत्तीसगडमध्ये एकूण ३१, तर काँग्रेसने ३० ओबीसी नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन न दिल्यामुळे नाराजी

छत्तीसगडमधील कावर्धा तहसीलमधील शेतकरी भगत पटेल यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता भाजपाचे उमेदवार विजय शर्मा यांना मिळणारी हिंदू मते काँग्रेसच्या मोहम्मद अकबर यांना मिळतील. त्यामुळे येथून आता काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होईल, असे मत व्यक्त केले. अकबर रोहिंग्या मुस्लिमांना येथे आश्रय देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळला जातो. पटेल यांना भाजपाचा विजय व्हावा असे वाटते. मात्र, काँग्रेसप्रमाणे भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“सर्वजण मुलींचीच काळजी घेतात”

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते शिवराज चौहान यांच्या लाडली बहना योजनेची गोटेगाव, नरसिंहपूर या भागातील ओबीसी मतदारांमध्ये चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १२५० रुपयांची मदत केली जाते. पिपारिया येथे एका लोधी समाजाच्या तरुण मतदाराला या योजनेबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ‘या योजनेमुळे महिलांना महिन्याला पैसे मिळतात. मात्र, या सरकारने पायाभूत सुविधा आणि नोकरी निर्माण करण्याकडे लक्ष दिलेले नाही’, अशी प्रतिक्रिया या तरुणाने दिली. तसेच महिलांना प्रतिमहा १२५० रुपये मिळतात; हे पैसे महिला आपल्या पतीला देत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कौटुंबिक कलह पाहायला मिळत आहेत. येथे सर्वजण मुलींचीच काळजी घेतात. मुलांवर कोणीही प्रेम करत नाही, अशी खंत या तरुणाने व्यक्त केली.

“विधानसभेत काँग्रेस, लोकसभेत भाजपा”

मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नरदेव या मतदारसंघातील सुरज या तरुणाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील भाजपाने माझा भ्रमनिरास केला आहे. सध्या देशातील दहशतवाद कमी झाला आहे, राम मंदिर लवकरच प्रत्यक्षात येईल. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मी काँग्रेसचे नेते कमलनाथ, तर लोकसभेच्या निवडणुकीत मी भाजपाला मतदान करेन, अशी प्रतिक्रिया या तरुणाने व्यक्त केली.

“आमच्याकडे जात हा प्रमुख मुद्दा नाही”

बारगी मतदारसंघातील जबलपूर येथील विश्वकर्मा जातीतील काही मतदारांशी इंडियन एक्स्प्रेसने चर्चा केली. या मतदारांनी जातीआधारित जनगणनेचा उल्लेखही केला नाही. याच मतदारांतील एकाने आमच्या राज्यात जात हा मुख्य मुद्दा नाही. हा मुद्दा उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत असेल. आमच्याकडे मात्र तसे काही नाही, अशी प्रतिक्रिया दिली.