डॉ. रत्नाकर महाजन यांचे मत
भ्रष्टाचार हा देशविकासातील सर्वात मोठा अडथळा असून, जात ही देशातील भीषण समस्या आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
‘आपला देश घडतोय आणि बिघडतोय’ या विषयावरील व्याख्यानात महाजन बोलत होते. माजी नगरसेवक सतीश दरेकर, मानव कांबळे, राजेंद्र घावटे, विश्वनाथ महाजन, नामदेव जाधव, काशिनाथ नखाते, मल्हारी बोडके आदी उपस्थित होते. डॉ. महाजन म्हणाले, मागासवर्गीयांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी १९५२ मध्ये घटनादुरुस्ती करून आरक्षणाला सुरुवात झाली. आज आरक्षण धोरणाचे धिंडवडे निघाले आहेत. आरक्षणाच्या वेगवेगळय़ा मागण्या होत आहेत. त्या असमर्थनीय आहेत. दुर्दैवाने एकाही राजकीय पक्षाकडे त्याला ठाम विरोध करण्याचे धैर्य नाही. सध्याच्या काळात धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्यासारखी वाटते. असे असले तरी विकासातील सर्व अडथळे दूर सारून देश नक्कीच घडत राहील. देश घडण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. काही घटक आपला संकुचित राजकीय स्वार्थ मनाशी बाळगून ही प्रक्रिया बिघडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, देश घडण्याचीच प्रक्रिया प्रबळ राहील. पौराणिक काळापासून आपल्या देशाचे नाव भारत आहे. हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा