महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रांमध्ये परीक्षेचा वार देण्यामध्ये चूक झाली असल्यामुळे गोंधळ होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीआयएस पदासाठीची परीक्षा २५ ऑगस्टला (रविवारी) होणार आहे. मात्र, या परीक्षेच्या प्रवेश पत्रांमध्ये शनिवार देण्यात आला आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. मात्र, परीक्षा रविवारी म्हणजे २५ ऑगस्टलाच होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 2:47 am