पुणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयानुसार स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादा सवलतीच्या निर्णयातील कालावधी १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ ऐवजी १ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ करावा, या संदर्भातील शुद्धीपत्रक तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केली आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे पदभरती परीक्षा न झाल्याने या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी हुकली. त्यामुळे वयोमर्यादा वाढवण्याची मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १७ डिसेंबर २०२१ रोजी वयोमर्यादेत सवलतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. या शासन निर्णयानुसार १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातींच्या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली. मात्र १७ डिसेंबर २०२१नंतर कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. १७ डिसेंबर २०२१नंतर कमाल वयोमर्यादा ओलांडलेले अनेक उमेदवार आहेत. शासनाच्या निर्णयामुळे अडीच वर्षे अधिक वय असणारे उमेदवार परीक्षेला पात्र ठरत आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांना राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ आणि दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२मध्ये संधी मिळण्यासाठी शासन निर्णयातील कमाल वयोमर्यादेचा कालावधी १ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ करण्याची मागणी असल्याने याचिकाकर्ते वरूण येर्लेकर, राजेंद्र कवळे, विशाल पाटील, पराग वंजारी यांनी सांगितले.

Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया