पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागणार असून, प्रवेशासाठी गुणवत्ता यादी ११ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.

शिक्षण विभागाने ही माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित, चार विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. पाचव्या विशेष फेरीत पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश, कोट्यातील जागांसाठी ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागेल. त्यानंतर ११ सप्टेंबरला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी