बेकायदा आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाइक टॅक्सी उपयोजनवर (ॲप) बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी १२ डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी केले.

हेही वाचा >>>पुणे: नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

रिक्षा चालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), पोलीस उपायुक्त (सायबर शाखा), पोलीस उपायुक्त (वाहतूक), पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीच्या बैठकीनंतर बाइक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

हेही वाचा >>>पुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती

जिल्हा प्रशासनाने रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदा वाहतूक होऊ नये, यासाठी आरटीओकडून खास मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदा बाइक टॅक्सी ॲप चालविणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपायुक्तांमार्फत पाठपुरवा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.