पुणे : स्वात्र्यंतोत्तर ‘प्रजासत्ताक भारताचे’ सत्यमेव जयते या अर्थपूर्ण ‘राष्ट्रीय ब्रीद’ सह तयार झालेले बोधचिन्ह हे भारताच्या लोकशाहीरूपी संविधानात्मक वाटचालीची दिशा आणि संकेत दर्शवणारे असून ‘सत्यमेव जयते’ ब्रीद चा उल्लेख नसताना ‘अशोक स्तंभाचे’ अनावरण कसे करण्यात आले, अशी विचारणा काँग्रेसचे राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

तिवारी म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर लोकशाहीरुपी भारताची निर्मिती १९४७ ला झाल्यानंतर १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक भारताची’ जगासमोर ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, आदींच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह घटना-समितीने मोठ्या कालावधीनंतर विचार विमर्षाने संविधान दिले. प्रजासत्ताक भारताचे ‘सत्य मेव जयते’ हे अर्थपूर्ण ब्रीद निश्चित करून, त्यावर ३ सिंहाची प्रतिमा बसवून संविधानाचे बोधचिन्ह दिले. मात्र भाजप नेतृत्वाने मुळात मनमानीपणे हजारो कोटींचा खर्च करून ‘सेंट्रल व्हीस्टा’ च्या रूपाने ‘नवे संसद भवन, पंतप्रधान कार्यालय आणि निवास स्थान’ कोरोना संकट काळातच बांधण्याचा घाट धातला यावर मुळात अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक बाबतीतच ‘राजकीय श्रेय’ घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्यमेव जयते’ या राष्ट्रीय ब्रीद वाक्याचे वावगे काय आहे, अशी विचारणा तिवारी यांनी केली.

PM Modi and Jitendra awhad
“राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार…”, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप; म्हणाले, “काँग्रेसच्या नावावर…”
Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…