आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोध पक्ष भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच भाजपाने बीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली. यानंतर सोमवारी (१८ एप्रिल) या पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक झाली. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते पुण्यात बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षितच आहे. ज्याप्रकारे यांचा बुर्खा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी काहीही केलं तरी यात्रा थांबणार नाही. आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करू.”

Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

अज्ञातांकडून भाजपाच्या पोलखोल यात्रेच्या रथाची तोडफोड

भाजपाकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. तसेच हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपाने पोलखोल यात्रा सुरू केलीय. मात्र, त्याआधीच या पोलखोल यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची सोमवारी (१८ एप्रिल) काही अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. भाजपाने ही तोडफोड महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केलाय.

हेही वाचा : “मी आमचे मित्र देवेंद्रजींचा व्हिडीओ दाखवला, त्यात…”, फडणवीसांचा उल्लेख करत पटोलेंचा राज ठाकरेंवर निशाणा

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ही तोडफोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केलीय. तसेच आरोपींना तातडीने अटक न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिलाय.