पुणे : लागवडीपासून सुरू झालेले कांदा पिकामागील शुक्लकाष्ट यंदा सुरूच आहे. दर्जेदार, निर्यातक्षम कांदा बाजारात येत नसल्याने मागणी नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी दरही पडले आहेत. बाजारात नेलेला कांदा वेळेत विक्री होत नाही. त्यात भर म्हणून पावसाळी वातावरणामुळे हवेतील आद्र्रता वाढून चाळीत ठेवलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्याबरोबर केंद्र सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकच्या कळवण तालुक्यातील बार्डे येथील कांदा उत्पादक शेतकरी पंडित वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा लागणीपासूनच संकट निर्माण झाले आहे. थंडीत कांद्याची लागवड होते. कांदा जसजसा मोठा होईल, तसतसे तापमानात थोडी थोडी वाढ होत जाऊन कांदा काढणीला येण्याच्या काळात उष्णता वाढणे कांदा पिकाला पोषक असते. पण, यंदा अचानक थंडी, अचानक उष्णता, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका कांद्याला बसला. चाळीत साठवलेला कांदा फार तर पाच महिने चांगला राहतो.  विक्रीसाठी कांदा बाजारात नेला तरीही सौदे वेळेवर होत नाहीत. आठवडा सुट्टीचा दिवस वगळूनही कामगार नाहीत, मागणी नाही, असे सांगून बाजार बंद ठेवला जातो. त्यामुळे आवक वाढून दर आणखी पडतात. सध्या सरासरी ९०० ते १२०० रुपये प्रति िक्वटल दर मिळतो आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion farmers in distress as prices fall zws
First published on: 08-09-2022 at 04:29 IST