पुणे : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.त्या मृतांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील पर्यटक होते.तर या 6 जणांमधील 2 जण हे पुण्यातील कर्वेनगर भागात राहणारे संतोष जगदाळे आणि कोंढवा भागात राहणारे कौस्तुभ गणबोटे हे होते.या घटनेनंतर दोन्ही कुटुंबीयांची विविध क्षेत्रातील मंडळींनी सांत्वनपर भेट घेतली.या सर्व घडामोडी दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपयांची आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्या निर्णयाबाबत पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, आमच्या कुटुंबियांच्या दृष्टीने राज्य सरकारने आर्थिक मदत आणि नोकरी बाबत घेतलेल्या निर्णयाचे, मी सरकारचे आभार मानते,तसेच लोकांची मदत करता येईल, अशा पदावर (आसावरी जगदाळे ) काम करण्याची संधी तिला राज्य सरकारने तिला द्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आसावरी जगदाळे म्हणाल्या, माझ्या वडीलांनी कधी ही मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केलाच नाही.तर नेहमी त्यांनी मला एका मुलाप्रमाणे सांभाळल,मी खूप मोठ्या पदावर काम करावं,लोकांच्या मदतीला जाव,ही वडिलांची इच्छा होती.ती त्यांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.