राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरु होती. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचले होते. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे.

एकीकडे पुण्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून चिंतेचं वातावरण असताना पुणेकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. पुण्यात करोनासंदर्भात कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

“पुण्यात शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. तसंच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांना यामध्ये मुभा असणार आहे. हॉटेल, रेस्तराँ रात्री १० नंतर बंद असतील. दरम्यान त्यांना ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच रात्री १० नंतर एका तासासाठी हॉटेल, रेस्तरॉ यांना होम डिलिव्हरीची परवानगी आहे,” अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

आणखी वाचा- एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत

पुढे ते म्हणाले की, “लग्न समारंभ, धार्मिक विधी, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त ५० लोकांना परवानगी असणार आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. याशिवाय मॉल, हॉल्स, चित्रपटगृह रात्री १० नंतर बंद असतील. दरम्यान एमपीपएससी, युपीएससी परीक्षार्थींची गरज लक्षात घेता कोचिंग क्लाेस आणि ग्रंथालयं ५० टक्के क्षमेतने कार्यरत राहू शकतात”. गार्डन केवळ सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद राहणार आहेत.