पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२२ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार असून, पवित्र संकेतस्थळावर नोंदणीसाठी शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१८ आणि २०१९ मध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रतिबंधित केले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ ला प्रविष्ट होता येणार नाही असा निर्णय दिला होता. त्यामुळे या उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावरील शिक्षक भरती नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नव्हते.

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध आणि तरुणी गर्भवती होताच…

मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित उमेदवारांकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री समन्वयक अधिकाऱ्यांनी केल्यानंतर स्व-प्रमाणन करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून पात्रता निश्चित करावयाची कार्यवाही समन्वयक अधिकारी यांच्याकडून होणार आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ विचारात घेता स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली.

हेही वाचा : मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय

टीईटी परीक्षांत गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या आदेशानुसार स्व-प्रमाणनाची संधी देत पदभरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली.